संततधारमुळे धरणे फुल्ल

संततधारमुळे धरणे फुल्ल

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची कधी रिपरिप तर कधी संततधार सुरुच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.

बहुतांश ठिकाणी पूरपस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील तापी नदीवर असलेल्या हतनुर प्रकल्प पाणलोट क्षेत्र परिसरात गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली असून, दिवसभरात पुन्हा 16मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

त्यामुळे प्रकल्पात येणार्‍या पाण्याच्या आवकेत देखील वाढ होत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात येऊन 1 लाख,39 हजार, 694 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात होता.

पाण्याच्या आवकेत सातत्याने वाढ होत असल्याने आगामी 72 तासात नदीपात्रातील विसर्गाचे प्रमाण वाढते होते. प्रकल्पात पाण्याची आवक कमी होत असल्याने सायंकाळी 5 वाजता केवळ 24 दरवाजे पूर्ण उघडून 65 हजार 624 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात तापी नदी व हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. हतनूर प्रकल्प पाण्याची पातळी 209.620 मिटर असून 191.40 मि.मी. क्युबिक आहे. पाणलोट क्षेत्रात 16 मिमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने गेल्या 24 तासात प्रकल्पात 200.60दलघमी पाण्याची आवक झाली होती.

रविवार दि.30 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता हतनूर प्रकल्पाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून 1लाख, 46हजार 694 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. तर, पाण्याची आवक कमी झाल्याने सकाळी 9 वाजता प्रकल्पाचे 41 दरवाजे उघडून 1लाख,39हजार,694 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात होता.

प्रकल्पात पाण्याची आवक कमी झाल्याने सायंकाळी5 वाजता केवळ 24 दरवाजे उघडून 65,624 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com