जिल्ह्यात आतापर्यंतचे सर्वाधिक 24 जणांचा मृत्यू

1 हजार 147 नवे बाधित तर 1 हजार 209 करोनामुक्त
जिल्ह्यात आतापर्यंतचे सर्वाधिक 24 जणांचा मृत्यू

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाच्या दुसर्‍या लाटेत मृत्यू होणार्‍यांची दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही सहा दिवसांपासून जिल्ह्यात दररोज मृत्यू होणार्‍यांची संख्या वाढत असून आज आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यू होणार्‍यांची नोंद झाली आहे.

आज दिवसभरात 24 जणांचा मृत्यू झाला असून 1 हजार 147 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तसेच 1 हजार 209 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मृत्यू होणार्‍यांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यात मृत्यूचा कहर सुरुच आहे.

जिल्ह्यात आज 19 एप्रिल रोजी दिवसभरात 1 हजार 147 नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या 1 लाख 10 हजार 424 एवढी झाली आहे.

दुसरीकडे 1 हजार 209 रुग्ण करोनामुक्त झाले असून मुक्त होणार्‍यांची संख्या ही 97 हजार 362 इतकी झाली आहे. यात जळगाव शहर 236, जळगाव ग्रामीण 34, भुसावळ 153, अमळनेर 38, चोपडा 124, पाचोरा 25, भडगाव 19,धरणगाव 38, यावल 43, एरंडोल 72, जामनेर 55, रावेर 139,पारोळा 27, मुक्ताईनगर 41, चाळीसगाव 55, बोदवड 36 आणि इतर जिल्ह्यातील 12 असे एकूण 1 हजार 147 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

चोपड्यात 5 जणांसह जिल्ह्यात 24 जणांचा मृत्यू

सोमवारी सलग सहाव्या दिवशी जिल्ह्यात तब्बल 24 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चोपडा तालुक्यात पाच, पाचोरा तालुक्यात 4, जळाव शहर व जामनेर तालुक्यातील प्रत्येकी तीन, भडगाव, भुसावळ, जळगाव, धरणगाव तालुक्यातील प्रत्येकी दोन तर बोदवड तालुक्यातील एकाचा समावेश आहे. आतपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 1 हजार 955 इतकी झाली आहे.

402 अहवाल प्रलंबित

प्रशासनाकडून बाधित रुग्णाच्या संपर्कात येणार्‍यांची चाचणी केली जात आहे. तात्काळ चाचणी तात्काळ उपचार ही पद्धत अवलंबविली जात आहे.

परंतु दुसरीकडे रुग्णांचे अहवाल चार ते पाच दिवस प्रलंबित असल्याने रुग्ण बिनधास्तपणे शहरात फिरत आहे. आज जिल्ह्यात सुमारे 402 रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com