जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी २० जणांचा मृत्यू

९३४ नवे बाधित तर १ हजार १७४ रुग्ण करोनामुक्त
जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी २० जणांचा मृत्यू

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यातील करोनामुळे मृत्यू होणार्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आज दिवसभरात कोरानामुळे जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी २० जणांचा मृत्यू झाला आहे.

तसेच करोनाचे ९३४ नवे बाधित रुग्ण आढळून आले तर १ हजार १७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
जिल्ह्यात आज १५ एप्रिल रोजी दिवसभरात ९३४ नवे बाधित रुग्ण आढळून आल्याने ती संख्या १ लाख ६ हजार ७० एवढी झाली आहे.

दुसरीकडे १ हजार १७४ कोरोनामुक्त झाले असून मुक्त होणार्‍यांची संख्या ही ९२ हजार ८७३ इतकी झाली आहे.

यात जळगाव शहर २२०, जळगाव ग्रामीण ४३, भुसावळ ४२, अमळनेर २४, चोपडा ७३, पाचोरा ८, भडगाव १२ धरणगाव ५८, यावल ३१, एरंडोल ८४, जामनेर ८५, रावेर १०६, पारोळा २६, मुक्ताईनगर ४०, चाळीसगाव ६३, बोदवड ८ आणि इतर जिल्ह्यातील ११ असे एकूण ९३४ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात मृत्यूचे तांडव सुरु

गुरुवारी सलग दुसर्‍या दिवशी जिल्ह्यात तब्बल २० बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चोपडा तालुका ४, जळगाव शहर व भुसावळ तालुका प्रत्येकी तीन, रावेर, यावल, एरंडोल तालुक्यातील प्रत्येकी दोन तर धरणगाव, पाचोरा, भडगाव, मुक्ताईनगर या तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

आतपर्यंत मृत्यूह होणार्‍यांची संख्या ही १ हजार ८६८ इतकी झाली असल्याने जिल्ह्यात मृत्यूचे तांडव सुरुच आहे.

१ हजार ८७९ अहवाल प्रलंबित

प्रशासनाकडून बाधित रुग्णाच्या संपर्कात येणार्‍यांची चाचणी केली जात आहे. तात्काळ चाचणी तात्काळ उपचार ही पद्धत अवलंबविली जात आहे.

परंतु दुसरीकडे रुग्णांचे अहवाल चार ते पाच दिवस प्रलंबित असल्याने रुग्ण बिनधास्तपणे शहरात फिरत आहे. आज जिल्ह्यात सुमारे १ हजार ८७९ रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com