<p><strong>चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-</strong></p><p>बोगस बियाण्यांमुळे चाळीसगाव तालुक्यातील शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले व राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तालुक्यात बोगस बियाणेमुळे शेतकर्यांची झालेल्या फसवणूकीबाबत ग्राहणे मांडले. तसेच संंबंधीत कंपनीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.</p> .<p>तालुक्यातील शेतकर्यांनी खरेदी केलेल्या हायटेक कंपनीच्या ३२०६ या ज्वारी वाणाच्या कणसांना दाणेच न आल्याने शेतकर्यांची फसवणूक झाल्याने कंपनीवर गुन्हा दाखल करून शेतकर्यांच्या झालेल्या कोट्यवधीच्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी देखील मागणी आमदार चव्हाण यांनी केली. </p><p>यावेळी माजी आमदार तथा कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, भाजपा शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ आदी उपस्थित होते. याबाबत मा.कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी तात्काळ राज्याचे गुणनियंत्रक संचालक यांना चौकशीचे आदेश देऊन सबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. </p><p>तसेच कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले तर कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले साहेब यांनी देखील या प्रकरणात स्वतः वैयक्तिक लक्ष घालून शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले आहे.</p>