<p><strong>जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :</strong></p><p>जिल्हयात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निडणुका जाहीर होताच ग्रामीण भागात निवडणूक लढवू इच्छिणार्यांना उधाण आले आहे. </p>.<p>आतापासूनच नव्हेतर गेल्या वर्ष दिडवर्षांपासून या हौसे नवसे गवसें कडून याची पूर्वतयारी केली जात होती. ती आता वेग घेऊ लागली आहे. </p><p>गेल्या सात आठ महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे हॉटेल, ढाबे, आदी व्यवसायीकाचेे व्यवसाय कोलमडून पडले होते. आता ग्रामपंचायत निवडणुकीमुळे या व्यावसायिकांना पुन्हा उभारी मिळणार आहे.</p>.<p>जिल्हयात 1152 ग्रमापंचायतींपैकी पहिल्या टप्प्यात 783 ग्रमापंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यात अनेक महत्वाच्या गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याने गावागावात लोक गटा-गटाने निवडणुकीविषयी चर्चा करताना दिसून येत आहेत.</p><p>कोरोना महामारीच्या काळात राज्यभर दोन महिने लॉकडाऊन करण्यात आले होते. या काळात हॉटेल व ढाबे चालकांचे मोठे नुकसान झाले होते.</p><p>लॉकडाऊन संपल्यानंतर हॉटेल, ढाबे सुरू करण्यात आले. मात्र गिर्हाईकांनी कोरोनाच्या भितीने त्यांच्याकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे हॉटेल, ढाबे चालू होवूनही ओस पडले होते.</p><p>जिल्हा परिसरातील प्रमुख गावाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याने चावडी बैठका, पार्ट्या यांनी जोर धरला असून परिसरातील प्रमुख गावाच्या ग्रामपंचायत निवडणुका हॉटेल व धाबा चालकांनी पर्वणीच ठरणार आहेत.</p>