शालेय पोषण आहार घोटाळ्याची चौकशी करा - एकनाथराव खडसे.<p><strong>जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :</strong></p><p>जिल्ह्यातील मुक्ताईनगर,चाळीसगावसह चार तालुक्यात शालेय पोषण आहार गैरव्यवहारप्रकरणी तक्रारदार रवींद्र शिंदे यांनी गेल्या काही महिन्यापासून पाठपुरावा सुरू असून यात बनावट शिक्के व कागदपत्रांचा देखील वापर झाला आहे. </p>.<p>त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आपण गृहमंत्र्यांकडे केली असून त्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश देखील दिले आहेत, अशी माहिती माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.</p><p>बीएचआर, मविप्र यासह शालेय पोषण आहार घोटाळ्याचे प्रकरण जळगाव जिल्ह्यात गाजत असून सुनिल झंवर यांच्या कार्यालयात शिक्षण विभागाचे बनावट शिक्के सापडल्याने पुन्हा शालेय पोषण आहार चर्चेत आला आहे. </p>.<p>या प्रकरणी खडसे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, या प्रकरणात मी स्वत: सीईओंना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.</p><p> मात्र, कुणाचा तरी दबाव असल्याने त्यांनी कारवाई केली नाही. त्यामुळे आपण स्वत: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कारवाईबाबत पत्र दिले आहे. </p><p>मात्र, यात बनावट शिक्के व कागदपत्रांचा वापर झाला असल्याने आपण गृहमंत्र्यांना कारवाईबाबत विनंती केली आहे. </p><p>तसेच तक्रारदार रवींद्र शिंदे यांच्याकडील पुराव्यानिशीचे कागदपत्र देखील दिली आहेत. याबाबत गृहमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.</p>