<p><strong>जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :</strong></p><p>जिल्हा परिषदेच्या ग्रामनिधीतून ग्रामपंचायतींना कर्ज देण्यात आले होते.परंतु, काही ग्रामपंचायतींनी थकबाकी अद्यापी भरलेली नाही.</p>.<p>जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील 56 ग्रामसेवकांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जि.प.ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे यांनी दिली.</p><p>जिल्हा परिषदेच्या ग्रामनिधीतून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कर्ज देण्याची योजना असून सन 1980 पासून ते आजपर्यत जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी कर्ज घेतलेले आहे.</p><p> यापूर्वी ग्रामपंचायतींना पुरेसा निधी नसल्याने बहुतांश ग्रामपंचायतींनी ग्रामनिधी अंतर्गत कर्ज घेतलेे. मात्र, काही ग्रामपंचायतींनी मुदतीत कर्ज फेडलेले नसल्याने नाही. वर्षानुवर्ष या थकबाकीकडे दुर्लक्ष झाल्याने 21 कोटीवर कर्ज थकीत आहे. </p>.<p>आता ज्या ग्रामपंचायतींनी ग्रामनिधीचे कर्ज अद्यापी भरलेली नाही. ग्रामसेवकांना वारंवार सूचना देवूनही त्या गावातील ग्रामसेवकांनी याकडे कानाडोळा केला आहे. </p><p>त्यामुळे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील 56 ग्रामसेवकांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत.</p><p>ग्रामनिधी थकबाकीप्रकरणी यापूर्वी 105 ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आलेल्या होत्या. मात्र, त्यापैकी 55 ग्रामसेवकांनी खुलासासह काही थकीत रक्कमेचे धनादेश जिल्ह्यातील गटविकास अधिकार्यांकडे जमा करण्यात आले आहे. </p><p>तर काहींनी कर्ज फेड करण्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील 56 ग्रामसेवकांना जि.प.प्रशासनाकडून नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत</p>