<p><strong>यावल - Yaval</strong></p><p>पपईने भरलेल्या आयशर टेम्पो अपघाताने आज जिल्हावासिय सुन्न झालले असून या अपघातात एकाचवेळी १५ जण ठार झाल्याची घटना घडली. या घटनास्थळाला नाशिक विभाग विशेष पोलीस महानिरिक्षकांनी भेट देवून पाहणी केली.</p>.<p>हा अपघात रात्रीच्यावेळी घडल्याने व मयत झालेले सर्व मजूर झोपेतच असल्याने ते सर्वजण पपईच्या ढिगाखाली दबले गेल्याचे समजते. या अपघाताचे वृत्त समजताच पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे.</p><p>नाशिक विभाग पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव दिघावकर यांनी किनगाव येथे घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली व चौकशीचे आदेश दिलेत यावेळी त्यांचेसोबत अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव व यावल रावेर पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व सहकारी उपस्थित होते.</p>