अखेर न्याय मिळाला... अंजली पाटील यांना निवडणूक लढविण्यास न्यायालयाकडून हिरवा कंदिल

सर्वसाधारण महिला राखीव गटातून उमेदवारी
अखेर न्याय मिळाला... अंजली पाटील यांना निवडणूक लढविण्यास न्यायालयाकडून हिरवा कंदिल

जळगाव - Jalgaon

भगवान के दरबार मे देर है, लेकीन अंधेर नही या उक्तीप्रमाणे अखेर भादली येथील अंजली पाटील उर्फ अंजली गुरू संजान यांना सर्वसाधारण महिला राखीव गटातून औरंगाबाद उच्च न्यायालयाने निवडणूक लढविण्यास हिरवा कंदिल दिला आहे.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी भादली बु. येथील वार्ड क्र.५ मधून तृतीय पंथी उमेदवार अंजली पाटील उर्फ अंजली गुरू संजान यांनी मुदत पुर्ण होण्या अगोदरच जळगाव तहसिल कार्यालयात नामांकन अर्ज दाखल केला होता.

परंतु निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचा अर्ज छाननी अंती बाद ठरवला होता. यासंदर्भात अंजली गुरू यांनी ग्रामंचायत निवडणूक लढविण्याची संधी द्यावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या विरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com