<p><strong>जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :</strong></p><p>जळगाव रेल्वे स्टेशनवर दि . 25 मार्च रोजी सायंकाळी 5.45 वाजेच्या दरम्यान 3 बालके संशयास्पदरित्या फिरतांना समतोलच्या कार्यकर्त्यांना आढळून आले. </p>.<p>या बालकांची चौकशी केली असता, जळगाव शहराच्या सुप्रिम कॉलनी भागातील रहिवासी होते. घरातून कोणालाही न सांगता दुपारी 1 वाजता पळ काढला व मिळेल ती रेल्वे पकडून मुंबई गाठायचे त्यांचे नियोजन होते.दरम्यान.समतोलच्या कार्यकर्त्यांनी त्या तिघांना पालकांच्या स्वाधीन केले.</p><p>घर सोडून निघालेेल्या बालकांचे पालक एमआयडीसी मध्ये हातमजूरी करतात. केवळ बाहेर फिरण्याच्या बहाण्याने हि बालके जळगाव रेल्वे स्टेशनवर आले होते. </p>.<p>समतोल प्रकल्पाचे कार्यकर्ते प्रदिप पाटील, विश्वजित सपकाळे व योगानंद कोळी यांनी रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून बालकांच्या पालकांशी संपर्क साधला व पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पडून बालकांना पालकांच्या स्वाधीन केले. यावेळी रेल्वे पोलीस सचिन नाईक व पुराणिक यांचे सहकार्य लाभले.</p>