जळगाव - Jalgaon
महापौर भारती सोनवणे यांनी त्यांच्या वर्षभराच्या कार्यकाळात विशेषतः कोरोना काळात चांगले काम केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे गटनेते बंटी जोशी आणि प्रशांत नाईक यांनी दि.26 फेब्रुवारी रोजी झालेल्या महासभेत सन्मानपत्र देऊन सत्कार केला.
या कृतीमुळे शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे बंटी जोशी यांनी आपल्या गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी मनपाच्या 16 व्या मजल्यावरील दालनात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. दरम्यान, शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.