<p><strong>धुळे - Dhule - प्रतिनिधी :</strong></p><p>शहरात करोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे. यामुळे दहावी व बारावीचे वर्ग वगळून पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग प्रतिबंधकात्मक उपाययोजना म्हणून </p>.<p>दि. 29 मार्चपर्यंत मनपा हद्दीतील सर्व शाळा बंद राहतील अशी माहिती महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी महेंद्र सोनवणे यांनी दिली आहे.</p><p>करोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे शासन मार्गदर्शक सूचनेनुसार महापालिका हद्दीतील इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग वगळून</p>.<p>पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग दि. 29 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. असे श्री. सोनवणे यांनी सांगितले.</p>