धुळे - Dhule - प्रतिनिधी :
धुळे अनलॉक झाल्यानंतर रस्त्यांवर गर्दीच गर्दी दिसून येत आहे. काही नागरिकांनी मास्क वापरणे देखील सोडून दिले आहे. तर सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे.
यामुळे शहरात पुन्हा कोरोना रुग्ण संख्या वाढते की काय? अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने व जिल्हा प्रशासनाने अटी, शर्तीवर धुळे शहर अनलॉक केले आहे.
परंतू याचा विसर धुळेकरांना पडल्याचे दिसून येत आहे. गर्दी करु नका असे आवाहन वारंवार जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा करीत असतांना नागरिक रस्त्यावर येत आहेत.
यामुळे प्रशासन हतबल झाले आहे. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी देखील गर्दी कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही.