Friday, April 26, 2024
Homeनगरपंतप्रधान गंभीर कधी होणार ? ; महसूलमंत्री थोरात यांचा सवाल

पंतप्रधान गंभीर कधी होणार ? ; महसूलमंत्री थोरात यांचा सवाल

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोनाचे संकट आणखी गंभीर होत चालले आहे. अशावेळी आपल्या पंतप्रधानांनी मागे टाळ्या वाजवायला लावल्या, आता दिवे लावायला सांगत आहेत. कोरोनासारखा गंभीर विषय हाताळताना ते गंभीर कधी होणार आहेत, असा सवाल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

५ तारखेला देशातील जनतेला दिवे लावण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे, त्यावर ना.थोरात प्रतिक्रिया देत होते. पंतप्रधान असल्यासारखे मोदी वागणार आहेत का? देशाचे प्रमुख म्हणून काही निर्णय घेणार आहेत की नाही? रुग्णालयांना मेडिकल इक्विपमेंट पुरविणे, जास्तीत जास्त राज्यांना संकटकाळात मदत करणे, नागरिकांना धीर देणे, याची आज अधिक गरज आहे. हे सोडून पंतप्रधान दिवे लावायला सांगत आहेत. हे पंतप्रधानांचे काम आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निदान कोरोनाच्या विषयात तरी पंतप्रधानांनी गंभीर व्हायला हवं असे ते म्हणाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या