मुंबई : भारताने पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी २५६ धावांचे लक्ष्य ठेवले असून दुसऱ्या डावाची सुरवात झाली आहे. मुंबई येथे या सामना खेळला जात आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारताला आमंत्रित केले. अश्या परिस्थितीत भारताने निर्धारित ४९. ०१ओव्हरमध्ये ऑल आऊट होत २५५ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर २५६ धावांचे लक्ष्य ठेवले.]
ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने तीन, पॅट कमिन्स आणि केन रिचर्डसन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले, तर अॅडम झांपा, एश्टन एगर यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.