Monday, April 29, 2024
Homeमहाराष्ट्रविरोधकांच्या १०० पिढ्या जरी आल्या तरी मुख्यमंत्री राजीनामा देणार नाही – संजय...

विरोधकांच्या १०० पिढ्या जरी आल्या तरी मुख्यमंत्री राजीनामा देणार नाही – संजय राऊत

मुंबई – ट्विटरवर #UddhavResign असा ट्रेंड सुरू झाला आहे. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी उध्दव ठाकरेंचा राजीनामा मागण्यांवर टीका केली आहे.

ते बोलतांना म्हणाले, विरोधकांच्या अश्या 100 पिढ्या जरी मैदानात उतरल्या तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची संकल्पना वास्तवात येणार नाही. महाराष्ट्रातले उद्धव ठाकरे सरकार मजबूत आहे. नेतृत्व खंबीर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संकटात चांगले काम करतायत याचे अनेकांना दु:ख होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाचा फायदा घेऊन राज्यात संभ्रम निर्माण करायचा आणि लोकांमध्ये उद्रेक घडवून हे राज्य अस्थिर व खिळखिळे करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे राऊत यांनी विरोधकांवर केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या