Friday, April 26, 2024
Homeनगरकृषी कर्जमाफी योजनेची मुदत ३० जून पर्यंत वाढवा – आ. विखे

कृषी कर्जमाफी योजनेची मुदत ३० जून पर्यंत वाढवा – आ. विखे

लोणी (वार्ताहर) – कोरोना व्हायरसच्या संदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेची मुदत ३० जून २०२० पर्यत वाढवावी अशी मागणी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्यात कोरोना व्हायरसच्या संदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाले आहेत.याबाबत आ. विखे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र देवून या योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांसमोर असलेल्या अडचणीकडे लक्ष वेधून याबाबत तातडीने निर्णय करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या