त्र्यंबकेश्वर : सापगाव येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून

त्र्यंबकेश्वर : सापगाव येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून

नाशिक : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून २० वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना सापगाव येथे घडली आहे.
गोकुळ नामदेव दिवे (२०) असे मृत तरुणाचे नाव आहे.

दरम्यान त्र्यंबकपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या सापगाव येथे काल मध्यरात्री हि घटना घडली आहे. येथील दिवे कुटुंबाच्या भावबंदकीच्या वादातून हा प्रकार घडला. किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यात गोकुळ दिवे या तरुणाचा खून झाल्याचे समजते आहे.

घटनास्थळी त्र्यंबकेश्वर पोलीस दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com