अहमदनगर (प्रतिनिधी) – चार महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर नगर जिल्ह्याला अखिलेश कुमार सिंह यांच्या रुपाने पोलीस अधीक्षक मिळाले आहे. बुधवारी रात्री उशिरा याबाबत गृह विभागाने आदेश काढले. सिंह हे मुंबई शहराच्या पोलीस उपआयुक्त (परिमंडळ- 7) पदावर कार्यरत होते. आता ते नगरचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहे.
ईशू सिंधू डिसेंबर 2019 मध्ये शिक्षणासाठी परदेशात गेल्याने गेल्या चार महिन्यापासून जिल्हा पोलीस अधीक्षक पद रिक्त होते. सिंधू गेल्यानंतर जिल्हात खून, दरोडा, गोळीबार, चोऱ्या, घरफोड्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे अनेक संघटना कडून पोलीस अधीक्षक लवकर मिळावे म्हणून सातत्याने मागणी होत होती. सध्या कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर अखिलेश कुमार सिंह हे पोलीस अधीक्षक म्हणून मिळाल्याने त्यांच्या समोर मोठे आव्हान असणार आहे.