मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि त्यासमोरील नविन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांचे निर्जंतुकीकरणासाठी उद्या दि.२९ व ३० एप्रिल रोजी मंत्रालयातील कामकाज बंद राहणार आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली.
करोनामुळे महामारीची परिस्थिती उदभवली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे.
त्यानुसार मंत्रालय आणि नविन प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांचे निर्जंतुकीकरणाचे काम २९ व ३० एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.