Friday, April 26, 2024
Homeनाशिक२९ फेब्रुवारीपासून राज्यात पाच दिवसांचा आठवडा; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

२९ फेब्रुवारीपासून राज्यात पाच दिवसांचा आठवडा; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : महाविकासाआघाडीच्या सरकारने कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. येत्या २९ फेब्रुवारीपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा आठवडा असणार आहे.

दरम्यान राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी ५ दिवसाचा आठवडा करण्याची केलली मागणी ठाकरे सरकारने मान्य केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णयाला मंजुरी देण्यात आली असून येत्या २९ फेब्रुवारीपासून याची अंमलबाजवणी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

केंद्राप्रमाणे राज्यात पाच दिवसांचा आठवडा करावा अशा बाबतचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. त्यानुसार, दररोज कामाची ४५ मिनिटे वाढवून 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय करता येईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या मंगळवारी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत मांडली होती. त्यानंतर, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ५ दिवसांचा आठवडा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

मात्र अत्यावश्यक सेवांसाठी पाच दिवसांचा आठवडा नसेल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या