गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या; नगर तालुक्यातील घटना

jalgaon-digital
1 Min Read
अहमदनगर (प्रतिनिधी) – तालुक्यातील दश्मीगव्हाण येथील शेतकऱ्याने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. दादासाहेब भाऊ शिंदे (वय- 52) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे. शिंदे यांनी झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले.
शिंदे यांच्यावर बँकेचे कर्ज असल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. कर्जामुळे आत्महत्या केली की अन्य कारणाने हे अधिक तपास केल्यानंतर समोर येईल असे तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शंकरसिंग रजपूत यांनी सांगितले.
निरीक्षक रजपूत जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहे. तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत नगर तालुका पोलीस अधिक तपास करत आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *