औरंगाबाद – मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरात करोनाबधितांची संख्या ९५ वर पोहचली आहे. आज १३ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
या सर्व रुग्णांना शहरातील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यातील करोनाबधितांचा आकडा ८,५९० पोचला असून ३६९ रुग्ण मृत्युमुखी झाले आहे. तसेच १२८२ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहे.