कोरोना – औरंगाबादमध्ये पहिला बळी, महाराष्ट्रातील संख्या

औरंगाबाद – शहरातील ५९ वर्षीय व्यक्ती सातारा परिसरातील रहिवासी असून १० दिवसापूर्वी तो मुंबईतून परतला होता. त्यानंतर कोरोनाची लक्षणे जाणवू लागण्याने सदरील व्यक्तीला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले होते. आज सकाळी या व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना बाधित आला होता. मात्र आता या रुग्णाचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाल आहे.

आज नव्याने २६ नवीन रूग्ण आढळल्याने राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ६६१ वर पोहचली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे.