दिल्ली – देशात करोना बधितांची संख्या जवळपास २७ हजारांपर्यंत पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशात २६,४९६ इतके करोनाबाधित असून ८२४ जण मृत्युमुखी झाले आहेत.
गेल्या २४ तासात १९९० नवीन रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंत ५८०४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. संचारबंदीमुळे देशाची व राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली असून ती पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे.