मुंबई : लोकलसेवा आज मध्यरात्री पासून ३१ मार्च पर्यंत पूर्णपणे बंद

मुंबई : लोकलसेवा आज मध्यरात्री पासून ३१ मार्च पर्यंत पूर्णपणे बंद

मुंबई :

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने गर्दी टाळण्यासाठी शेवटी रेल्वेने प्रशासनाने मुंबईतील लोकल सेवा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मुंबई मधील पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या चारही मार्गांवरील लोकलसेवा आज मध्यरात्रीपासून ३१ मार्च पर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. याबाबत रेल्वे बोर्डाच्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com