Friday, April 26, 2024
Homeनगरबस-कारची धडक होऊन नगरचे तिघे जागीच ठार

बस-कारची धडक होऊन नगरचे तिघे जागीच ठार

आंबिलवाडीजवळ घटना : दोन जण गंभीर जखमी

अहमदनगर (वार्ताहर) –  नगर-सोलापूर महामार्गावर अंबिलवाडी शिवारात शनिवारी दुपारी एसटी बस व कारची धडक होऊन अपघातात नगरचे तीन जागीच ठार झाले असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी, की एसटी महामंडळाची नगरच्या दिशेने जाणारी अक्कलकोट-मालेगाव (बस क्रमांक एमएचबीटी 3337) व नगरच्या दिशेकडून येणारी झायलो कार (एमएच-16 एटी-4447) यांची अंबिलवाडी गावाजवळ समोरासमोर धडक होऊन अहमदनगर येथील तीन जण जागीच ठार झाले आहे. फुलसौंदर मळा येथील अरुण बाबुराव फुलसौन्ंदर (वय-55), अर्जुन योगेश भगत (वय-12), ताराबाई शंकर भगत (वय-60) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. बसमधील सहा प्रवासी जखमी झाले आहेत. अपघात इतका भयंकर होता की, यामध्ये झायलो कारचा चक्काचूर झाला आहे. हे सर्व प्रवासी पंढरपूर येथे देवदर्शनासाठी चालले असल्याची प्राथमिक माहिती आहे. या महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असून अपघातांची मालिका सुरूच आहे.

दरम्यान नगर सोलापूर महामार्ग चौपदरीकरण सरकारने येणार्‍या आर्थिक वर्षात केले नाही तर जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाकाच्या कार्यालयात आणि अधिकार्‍यांच्या दालनात ठिय्या मांडू तसेच रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य रवींद्र भापकर यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या