कोरोणाच्या कामगिरीवर अण्णांनी केंद्र व राज्य सरकारचे केले कौतुक

कोरोणाच्या कामगिरीवर अण्णांनी केंद्र व राज्य सरकारचे केले कौतुक

पारनेर (प्रतिनिधी) – कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करत योग्य वेळी लॉक डाऊन केल्याने प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत आपल्या देशात कोरोणाला रोखण्यात चांगले यश आले आहे.

ही जमेची बाजू असल्याचे सांगून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र राज्य सरकारच्या कामाचे कौतुक केले. नागरिकांनी शासनाचे नियम पाळून घरी राहून प्रशासनाला सहकार्य करावे असेही आवाहन अण्णा हजारे यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com