राहुरी (प्रतिनिधी) – देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. संचारबंदीमुळे अत्यावशक सेवा वगळता सर्व बंद आहे. कोणतीही वस्तू चढ्या भावाने न विकण्याचे आदेश मुख्यमंत्री त्यांनी दिले होते.
राहुरीतील चार दुकानदार ग्राहकांना चढ्या भावाने मालाची विक्री करताना आढळले आहे. तसेच राहुरी येथील मेडिकल मध्ये कामगारांची संख्या नियमावलीच्या तिप्पट आढळून आली असता तहसीलदारांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.