बेंगळुरू: लोकसभा निवडणुकांना अवघे चार-पाच महिने उरले असताना कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील दोन अपक्ष आमदारांनी जेडीयू-काँग्रेस युतीच्या सरकारला दिलेला पाठिंबा काढून भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे कुमारस्वामी सरकार संकटात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
एच. नागेश आणि आर. शंकर अशी या दोन अपक्ष आमदारांची नावे आहेत. मंगळवारी त्यांनी राज्यपालांकडे लिखीत स्वरुपात आपला राजीनामा सोपवला आहे. “कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएस यांच्या युती सरकारमधून आम्ही ताबडतोब बाहेर पडत आहोत. त्यामुळे आपण आमच्या राजीनाम्यावर तत्काळ कार्यवाही करावी, असे या दोन्ही आमदारांनी राज्यपालांकडे पाठवलेल्या आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.”