नुकसान झालेल्या शेतांचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश

पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
नुकसान झालेल्या शेतांचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश

नंदुरबार - nandurbar

जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. शासनाने जिल्हाधिकाऱ्यांशी (Collector) बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली आहे. तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश शासनाच्या वतीने दिले, असल्याची माहिती पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित (Guardian Minister Dr. Vijayakumar Gavit) यांनी दिली आहे.

नंदुरबार तालुक्यातील कढरे, आसाने, वैंदाणे परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी पालकमंत्री डॉ.गावित यांनी केली, त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी आश्वस्त केले.

नुकसान झालेल्या शेतांचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश
तळोदा : अवकाळीने तोंडाशी आलेला घास हिरावला

शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील कढेरे, आसाने, वैंदाने सह जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या क्षेत्रात अवकाळी पाऊस झाला. अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.

नुकसान झालेल्या शेतांचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश
# Photo काठी संस्थानची वैशिष्ट्यपूर्ण राजवाडी होळी

उत्तर महाराष्ट्रासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने जिल्हयात बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने पालकमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत. यावेळी नंदूरबारचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नंदुरबार तालुका कृषी अधिकारी स्वप्निल शेळके, कृषी पर्यवेक्षक सुधीर पाटील, कृषी सहाय्यक सर्वश्री सतीश गिरासे कंडरे, बादल बंजारा, गजानन पाटील, सुवर्ण अहिरे तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.

नुकसान झालेल्या शेतांचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश
तळोदा : अवकाळीने तोंडाशी आलेला घास हिरावला
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com