शालकाकडून मेहुण्याचा अपहरण करुन खुन

बहिणीच्या मृत्यूस जबाबदार असल्याच्या संशय : दोघे ताब्यात : शहर पोलिसांची कारवाई
शालकाकडून मेहुण्याचा अपहरण करुन खुन

भुसावळ - प्रतिनिधी - bhusaval :

अपघातात बहिण व भाच्याच्या मृत्यूस जबाबदार असल्याच्या संशयावरुन शालकाने एका नातेवाईकाच्या मदतीने दिड महिनाभरापूर्वी मेहुण्याचा खुन केल्याची घटना उघडकीस आली.

या गुंतागुंतीच्या गुन्ह्यात शहर पोलिसांनी मेहनत घेत गुन्हा उघडकीस आणून दोघांना अटक केली असून दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत राजु शामराव मिरटकर (वय २८,रा.मोताळा) हा भुसावळ येथे बहिणीकडे वास्तव्यास होता.

मयत हा मे २०२० मध्ये पत्नी व मुुलासह सासरी दुचाकीवरुन जात असतांना झालेल्या अपघातात पत्नी व मुलाचा मृत्यू झाला यात मयत बचावला होता.

त्यामुळे शालक रामेश्‍वर गायकवाड (वय २२, रा.कोथळी ता.मोताळ. जि.बुलढाणा) याला मयत राजु यानेच बहिणीला मारल्याचा संशय होता. त्यातून त्याने राजु याला संपविण्याचा डाव रचला व त्याचा घात केला.

साधारण दिड महिण्यापूर्वी ९ ऑक्टोबर रोजी राजु हा भाच जावायासोबत मोताळा येथे गेला होता. तेथून तो परतला नव्हता. याबाबत मयत राजुची बहिण सुनीता युवराज पवार (रा. यावल रोड, भुसावळ) यांनी ३० ऑक्टोबर रोजी बोरखेडी ता. मोताळा पोलिसात भाऊ हरविल्याची व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी तपासचक्रे फिरवल्यानंंतर मयताचे भुसावळ येथील यावल नाका परिसरातून अपहरण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर दि.२० नोव्हेंबर रोजी हा गुन्हा भुसावळ शहर पोलिसत वर्ग करण्यात आला.

त्यानंतर डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पो.स्टे.चे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व एपीआय संदीप डुनगहू यांच्यासह सहकार्‍यांनी तपास चक्रे फिरवत रमेश रामदास पवार (रा.कंडारी, ता.भुसावळ) याला २२ रोजी ताब्यात घेऊन तपास चक्रे फिरविली असता त्याने, राजूचा शालक रामेश्‍वर याच्या मदतीने त्याचा घात केल्याचे सांगितले.

त्यानंतर शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन. विचारपुस केली असता. खुन नांदुर्‍याजवळ केला आहे.नेमका कोठे केला हे सांगता येणार नसल्याचे आरोपींनी सांगितल्यानंतर. या गुन्ह्यात खुनाच्या दिशेने तपास करणे कठिण होत होते.

या क्लिष्ठ प्रकरणात एपीआय संदीप डुनगडू यांनी मोताळा सह परिसरातील पोलिस ठाण्यात संपर्क करुन या घटनेच्या काळात अज्ञाता व्यक्तिच्या मृत्यूची नोंद आहे का या दिशेने तपास सुरु केला असता. जळगाव जामोद (जि. बुलढाणा) येथील पोलिस ठाण्यात दि. ३१ ऑक्टोबर २० रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर मयताची बहिण व पोलिसांनी मयताच्या कपड्यांवरुन मयताची ओळख पटविली.

दरम्यान, आरोपींनी मयताची पत्नी वारली असल्यामुळे तो पत्नीच्या शोधात असल्याचे सांगितले. होते यामुळे मयाच्या बेपत्ता होण्याच्या गुन्ह्यात तब्बल २० दिवसांचा विलंब लागला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com