हरिभाऊ जावळे राजकीय क्षेत्रातील राजहंस होते : हेमंत अलोने

हरिभाऊ जावळे राजकीय क्षेत्रातील राजहंस होते : हेमंत अलोने

भालोद,(Bhalod) ता. यावल । प्रतिनिधी

अनेक वर्षे राजकीय क्षेत्रात (political sphere) आमदार (MLA) आणि खासदार (MP) राहिलेले स्वर्गीय हरिभाऊ जावळे (Late Haribhau Jawale) हे राजकीय क्षेत्रातील राजहंस (swan) होते; असे प्रतिपादन दैनिक देशदूतचे संपादक हेमंत अलोने (Hemant Alone) यांनी केले. भालोद येथे श्रध्देय हरिभाऊ जावळे संस्था मित्र परिवाराने आयोजित केलेल्या जयंती अभिवादन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस.एस.राणे (जळगांव) हे होते. मंचावर श्रीमती कल्पना हरिभाऊ जावळे, डॉ. शशिकांत गाजरे आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी श्रध्देेय हरिभाऊ यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत श्री. अलोने यांनी त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू उलगडले. सामान्य जीवन जगणारे हरिभाऊ असामान्य नेतृत्व होते. सामान्य माणूस त्यांच्या जनसेवेचा केंद्रबिंदू होता.

राजकारणातील अनेक जय-पराजय त्यांनी पाहिले होते. आमदार -खासदार म्हणून सत्तेची,अहंकाराची हवा त्यांच्या डोक्यात कधीच गेलेली आम्ही पहिली नाही. राजकीय चारित्र्य सांभाळून त्यांनी जनसेवा केली. शेती हा भाऊंचा जिव्हाळ्याचा व अभ्यासाचा विषय होता. शेती आणि शेतकरी वर्गाच्या समस्या सोडविण्यात ते नेहमीच पुढे असलेले मी पाहिलेले आहे. सर्वांचे ऐकून घेणारा त्यांचा स्वभाव हा त्यांच्यातील देवपण सिद्ध करणारा होता, असे ते म्हणाले.

याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ. एस.एस.राणे श्रध्देय हरिभाऊंबद्दल म्हणाले की, हरिभाऊ राजकारणात असूनही राजकारणी नेते नव्हते. ते राजकारणात राहून सामाजिक चळवळीतील सुधारणावादी नेते होते. त्यांच्या स्वभाव,विचार आणि कृती ही एका प्रामाणिक समाजसेवकाची होती. समाजातील दुर्बल -उपेक्षित वर्गाच्या समस्या सोडविण्याची त्यांची धडपड ही निरपेक्ष भावनेने असे. राजकीय क्षेत्रात श्रध्देय हरिभाऊ यांच्यासारखी उत्तुंग व्यक्तिमत्वे अभावानेच दिसतात. भालोद परिसरातील मुला-मुलींना विशेषतः मुलींना उच्च शिक्षणाची संधी मिळावी या उदात्त हेतून त्यांनी भालोद कॉलेजची केलेली उभारणी त्यांच्या समाजसेवेची दृष्टी सांगणारी आहे. भाऊ त्यांच्या विचार व कार्याने नेहमीच जनतेच्या स्मरणात वंदनीय राहतील.

या प्रसंगी हरिभाऊंचे सुपुत्र अमोल जावळे यांनी ही मनोगत व्यक्त केले. वडिलांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान माझ्यासमोर आहे. हा जनसेवेचा आणि वैचारिक वारसा समोर ठेऊन मी नेहमीच कार्यरत राहून वडिलांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करेल.असे ते म्हणालेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष शशिकांत गाजरे यांनी तर आभार सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव अरुण चौधरी यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी केले. कार्यक्रमास सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित सर्व विद्याशाखांमधील शिक्षक वृंद, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी प्राचार्य.डॉ.एस.एस.राणे, हेमंत अलोने, श्रीमती कल्पना जावळे, व्हा.चेअरमन हेमलताताई इंगळे, भारती चौधरी, रजनी चौधरी, शशिकांत गाजरे, दिलीप हरी चौधरी,गणेश नेहेते, नारायण बापू चौधरी, अरुण चौधरी, नितीन चौधरी, भास्कर पिंपळे, सरपंच प्रदीप कोळी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदू महाजन, विलास चौधरी-भाजपा सरचिटणीस यावल तालुका, उज्जैनसिंग पाटील, निलेश राणे (फैजपूर), नंदू महाजन, पद्माकर महाजन, सुरेश धनके मधुकर कारखाना चेअरमन शरद महाजन, जि. प. सदस्या सविता भालेराव, भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, पंचायत समिती उपसभापती-योगेश भंगाळे, हर्षल गोविंदा पाटील भाजपा माजी तालुकाध्यक्ष, डॉक्टर नरेंद्र कोल्हे बी. के. चौधरी सर गोपालसिंग पाटील, सलीम तडवी, मीना तडवी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व हरिभाऊंवर प्रेम करणारे सर्वपक्षीय कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

येथील महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य अजयकुमार कोल्हे महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी वर्ग तसेच जिल्हा बँक संचालक गणेश गिरधर नेहते, दूध संस्थेचे चेअरमन संजय ढाके, वि.का.सो.चे. चेअरमन मनोज जावळे, उपसरपंचा कामिनी प्रदीप जावळे, ग्रामविकास अधिकारी सुनील गोसावी, मीनल जावळे, शरद परतणे मोहन जावळे, अरुण चौधरी आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com