जळगाव,jalgaon
शहरासह जिल्ह्यात काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal rain) सुमारे १४०० हेक्टवर रब्बी पिकांचे (rabi crops) नुकसान (damage) झाले आहे. रात्री अचानक विजांच्या कडकडाटासह (lightning) काही ठिकाणी गारांचाही पाउस (Hail rain) झाला. अधिक नुकसान रावेर, चाळीसगाव, यावल तालुक्यात झाले आहे. अवकाळी पावसाने ६४ गांवातील १९९१ शेतकऱ्यांचे नूकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचा पिच्छा सोडण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. होळी, धुळवडीला अवकाळी पावसाने झालेल्या नूकसानीतून शेतकरी सावरतो न सावरतो तोच पुन्हा गेल्या १५ मार्चपासून पून्हा अवकाळी पाउस जिल्ह्यात धुमाकुळ घालीत आहे. कधी हळूवार कधी जोरदार पावसाने खरिप पिकांसह केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
कालच्या पावसाने गहू, केळी, मका, बाजारी, हरभरा, ज्वारी, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात हरभरा १२९.७० हेक्टर, बाजरी ३५, गहू ३२७, मका ६८१, ज्वारी १८, भाजीपाला ११०, केळी ६.१० हेक्टरचे नूकसान झाले आहे.
मध्यरात्रीनंतरच्या पावसाने अनेक ठिकाणी पाण्याचे तळे साचले होते. तर शेतात चिखल झाला होता. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चिखलातून कसरत करीतच जावे लागले होते.
आज दिवसभर कडक उन पडले होते. मात्र सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शहरासह ढगांच्या जिल्हयात जोरदार पाउस झाला. पावसाची रिपरिप रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
तालुका निहाय नुकसान असे
यावल--५५.८२ हेक्टर
रावेर--८२९.२५
चाळीसगाव--४५९
पाचोरा--४.२०