
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) तडाखा बसत (Sitting down)आहे. वादळी पावसामुळे (stormy rain) अनेक झाडे उन्मळून (trees were uprooted) पडली आहे शहरासह जिल्ह्यात 28 व 29 एप्रिल अशा दोन दिवसात एकूण 1 हजार 730 हेक्टरवरील पिकांचे नुकसान (Damage to crops) झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान केळी, मका, कांदा पिकांचे झाले आहे. मुक्ताईनगर व चोपडा या दोन तालुक्यांना मोठे नुकसान आहे.
जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. वादळी पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहे. बेळी, नशिराबाद परिसरात अनेक घरांवर झाडे पडून नुकसान झाले आहे. विजांचा तारा तुटल्याने अद्यापही विज पुरवठा खंडीत झाला आहे. केव्हा अवकाळीचा चक्र तांबणार..याची चिंता शेतकर्यासह सर्वांनाच लागून आहे. जिल्हयात आतापर्यंतच्या अनुभवानुसार मे महिन्यात वादळी वार्याचा तडाखा बसतो.
मात्र यंदा प्रथमच एप्रिल महिन्यात अवकाळी पाउस व वादळ होण्याची घटना प्रथमच घडली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानूसार ङ्गग्लोबल वार्मिंग, अल निनोफच्या प्रभावामुळे उन्हाळ्यात पाउस पडत आहे. जळगाव जिल्हा उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा म्हणून ओळख आहे. यंदा अवकाळी पावसामुळे एप्रिल महिन्याचे तापमान 40 अंशाच्या आतच राहिले.
आगामी काही दिवसही पावसाचे असल्याने तापमान 39 ते 40 अंशापर्यंत राहिल. जळगाव जिल्ह्यात ङ्गमेफचे तापमान 44 ते 45 अंशादरम्यान असते. मात्र अवकाळी पावसाने तापमानाची तीव्रता कमी करून नागरिकांना दिला असला तरी शेती पिक, घरांचे नुकसान होत आहे.
प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू
जिल्ह्यात गत आठवड्यात वादळी पाऊस, गारपीट यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला मदत मिळावी म्हणून मदतीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम लवकरच होणार आहे.