चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी
एप्रील आणि मे हे दोन्ही महिने तीव्र उन्हासाठी ओळखले जातात नुकमताच संपलेला एप्रील महिना हा तीव (Temperature) तापमानाचा ठरला आहे. या महिन्यांचे तापमान ४४ अंशापर्यंन्त पोहचल्याने जिल्हाभरात पाण्याचा प्रश्न गंभीर होत असतांना नद्या कोरड्याठाक पडल्या आहेत. आता १ मे रोजी (girna dam) गिरणा धरणातून नदीपात्रात १५०० क्ययुसेस पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले.
रविवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी, (jalgaon) जळगाव वकार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग (Irrigation Department), जळगाव यांनी दिलेल्या आदेशानुसार गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचे चौथे आवर्तन १५०० क्युसेस सोडण्यात आलेले आहे. आज(दि,२) दुपारी १ वाजेपर्यंत हे पाणी तालुक्यातील जामदाच्या पुढे पोहचले होते. पिण्याच्या पाण्याचे चौथे आवर्तन हे भडगाव, पाचोरा, दहिगाव बंधारा, कानालदा पर्यंत पोहचणार आहे. हे आवर्तन फक्त पिण्याच्या पाण्यासाठी आहे. याचा कोणीही शेतीसाठी उपयोग करु नये असे आवाहन पाटबंधारे विभागाचे अभियंता हेमंत पाटील यांनी केले आहे.