जळगाव –
राज्यात कोरोनाचे संकट असताना शेतकर्यांवर अवकाळीचे संकट आले आहे. मंगळवारी संध्याकाळी सहा ते सातच्या सुमारास खान्देशातील अनेक ठिकाणी गारपीटसह अवकाळी पाऊस झाला.
धुळे, शिरपूर, चोपडा, रावेर या ठिकाणी झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. जळगाव शहरात वातारणात बदल झाला असून मेघगर्जना होऊ लागली आहे.