Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशजम्मू-काश्मीर : चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीर : चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर | Shrinagar

आज पहाटे पाच वाजता नगरोटा येथील बान टोल नाक्याजवळ ट्रकमधून आलेल्या दहशतवाद्यांमध्ये व जवानांमध्ये जोरदार चकमक झाली. आतापर्यंत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तर या चकमकीत एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे.

- Advertisement -

जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बान टोलनाक्यावर गुरुवारी पहाटे पाच वाजता दहशतवादी आणि भारतीय जवान आमनेसामने आले. यानंतर दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरु झाला. या पार्श्वभूमीवर नागरोटा परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून जम्मू-श्रीनगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री दिल्लीतील पोलिसांच्या विशेष सेलने दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. दोघांकडून काही महत्त्वाची कागदपत्रे आणि स्फोटके जप्त केली आहेत. ते व्हॉट्सअप ग्रुपवर पाकिस्तानशी चर्चा करत होत होती. अटक केलेले दोन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहेत. दोघेही जम्मू काश्मीरमधील बारामुला आणि कुपवाडा येथील आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या