परंतु सायंकाळपर्यंत दोघेजण घरी न आल्याने महिलेचा भाऊ गजानन गायकवाड त्याने चौकशी केली असता त्याला त्याच्या भाचीला सांगितले की, मला वावडदा वरून फोन आला होता की, माझ्या मायला माझ्या बापाने पाण्यात बुडवून मारले आहे. यावरून कुटुंबातील मयत महिलेचा भाऊ मुलगा मुलगी बहिण आणि इतर सदस्य यांनी त्वरित जंगिपुरा शिवारातील सोनद नदीवरील साठवण तलाव गाठला आणि पाण्यात उतरून बघितले असता सौ मंगलाबाई या मृत झाल्याचे समजले. त्यांनी पोलीस स्टेशन गाठत खुनाची माहिती दिली.