नाशिक | प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. मात्र, जीवनाश्यक वस्तू घेण्याच्या बहाण्याने अनेक नाशिककर अजुनही गांभीर्य विसरून गर्दी करताना नजरेस पडतात. शासनाच्या माध्यमातून अनेकदा सांगितले गेले असतानाही नाशिककरांची नाहक गर्दी भाजी खरेदी करण्यासाठी दिसून येत आहे.
शरदचंद्र पवार मार्केट याच परिसरात आहे याठिकाणी प्रचंड गर्दी परिसरातील रहिवाशी भाजी खरेदी करण्यासाठी करतात. विशेष म्हणजे, बाहेर कोरोनाच्या महासंकट असताना अनेक ग्राहकांच्या तोंडावर मास दिसून येत नाही. सामाजिक अंतर कुणी पाळताना दिसून येत नाही.
रस्त्यावरच ग्राहक खरेदी करण्यासाठी गर्दी करत असल्यामुळे सुरक्षेचा मोठा गंभीर प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे. स्थानिक पोलिसांनी याकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी काही सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.