Friday, April 26, 2024
Homeनगरउड्डाणपुलासाठी भूसंपादनाची प्रक्रिया दोन आठवड्यांत पूर्ण करा

उड्डाणपुलासाठी भूसंपादनाची प्रक्रिया दोन आठवड्यांत पूर्ण करा

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आदेश : खा. डॉ. सुजय विखे यांच्या पुढाकाराने दिल्लीत बैठक

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील उड्डाणपुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रीया तातडीने सुरू करण्यास केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी हिरवा कंदील दिला असून येत्या दोन आठवड्यात सर्व प्रक्रीया पूर्ण करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

- Advertisement -

संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशना दरम्यान खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर शहरातील उड्डाणपुलाच्या व अन्य राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन नगर शहराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाकडे त्यांनी लक्ष वेधले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन खा. डॉ. विखे यांनी नगर शहरातील उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जमिनीच्या भूसंपादनाचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती.

बुधवारी रक्षा भवन येथे उड्डाणपुला बरोबरच नगर बाह्यवळण रस्ता आणि नगर-करमाळा-सोलापूर या मार्गाचा प्रश्न चर्चिला गेला. या तिन्ही मार्गाचे काम सरंक्षण विभागाच्या जमिनीच्या भूसंपादनाअभावी रखडल्याचे खा. डॉ. विखे यांनी निदर्शनास आणून दिले.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या संरक्षण विभागाच्या व जमीन भूसंपादनाच्या विषयाशी संबंधित असलेल्या अधिकार्‍यांकडून माहिती जाणून घेतल्यानंतर या सर्व जमिनीच्या भूसंपादन विषयास मंजुरी दिली. याची कार्यवाही दोन आठवड्यातच पूर्ण करण्याचे मंत्र्यानी सूचित केले असल्याचे खा. डॉ. विखे यांनी सांगितले.

कामातील अडथळा दूर
भूसंपादनाच्या कारणामुळे गेली अनेक वर्षे नगर शहरातील उड्डाणपुलाचे काम रखडले होते.सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या कामातील अडथळा दूर झाला असून यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे खा. डॉ. विखे नगरच्या जनतेच्या वतीने आभार मानतो.
– खा. डॉ. सुजय विखे पाटील

- Advertisment -

ताज्या बातम्या