Friday, April 26, 2024
Homeनगरसाईबाबांच्या दरबारात येऊन मनाला शांती मिळत असून प्रसन्नता वाटते- जेष्ठ सिनेअभिनेता जितेंद्र

साईबाबांच्या दरबारात येऊन मनाला शांती मिळत असून प्रसन्नता वाटते- जेष्ठ सिनेअभिनेता जितेंद्र

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- साईबाबांच्या दरबारात येऊन मनाला शांती मिळत असून प्रसन्नता वाटते, याठिकाणी मी येत नसून बाबा मला बोलावून घेतात अशी प्रतिक्रिया जेष्ठ सिनेअभिनेता जितेंद्र यांनी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

दरम्यान बॉलीवुडचे सुप्रसिद्ध जेष्ठ सिनेअभिनेता जितेंद्र यांनी बुधवारी सकाळी साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. साईदर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मी शिर्डीला येत नाही मात्र साईबाबा मला येथे बोलावतात. आम्ही कितीतरी दिवसांपासून दर्शनासाठी येण्याचा विचार केला होता पण जोपर्यंत साईंचा बुलावा येत नाही तोपर्यंत शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मनशांती होते तसेच आत्मा तृप्त होतो. जणूकाही परमेश्वराला स्पर्श केल्यासारखे वाटते. माझ्या परीवारासह सर्वासाठी साईबाबांना प्रार्थना केली आहे. 22 वर्षापूर्वी स्टुडिओच्या बाहेर पाय ठेवला असून पुन्हा स्टुडिओत जाणार नाही हा संकल्प केला होता. सध्या माझी मुलगी आणी मुलगा यांच्या पाठीमागे उभा असल्याचे जितेंद्र यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या