Friday, April 26, 2024
HomeUncategorizedन्यायाधीशांनी पायी फिरून नागरिकांना दिला सामाजिक अंतर पाळण्याचा सल्ला

न्यायाधीशांनी पायी फिरून नागरिकांना दिला सामाजिक अंतर पाळण्याचा सल्ला

रावेर –

रावेरात आठ दिवसापासून कर्फ्यू लावण्यात आला असून आज सोमवारी सकाळी १० वाजेपासून ३ वाजेपर्यंत संचारबंदीत शिथिलता मिळाली होती.

- Advertisement -

याकाळात रावेर न्यायालयाचे न्या.आर.एल.राठोड यांनी शहरातील मेन रोडवरील रस्त्यावरील दुकानासामोरे रांगेत असलेल्या ग्राहकांना सामाजिक अंतर पाळण्याचा व तोंडाला मास्क बांधण्याचा सल्ला दिला.

तसेच शहरातील परिस्थितीचा आढावा जाणून घेतला,यादरम्यान ओम सुपर शॉपी पासून ते थेट आंबेडकर चौकापर्यंत त्यांनी पायी चालून दुकानाची पाहणी केली.

यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे,पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या