श्रीरामपुरात रेल्वे बोगी लुटली

jalgaon-digital
1 Min Read

श्रीरामपूर (प्रतिनिधी- शहरातील गोपीनाथनगर भागामध्ये गव्हाची पोती घेऊन जाणारी रेल्वे बोगी लुटल्याची घटना काल दुपारी घडली. काल दुपारी रेल्वे मालगाडी चितळीच्या बाजूने श्रीरामपूर (बेलापूर) रेल्वेस्थानकावर येत असताना ती मालगाडी अचानक शहरातील गोपीनाथनगर भागामध्ये थांबली. त्याचाच फायदा घेऊन परिसरातील काही जणांनी मालगाडीच्या एका बोगीचे कुलूप तोडून त्यातील गव्हाचे पोते लुटले.

घटनेची माहिती समजताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली व चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेतल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पैशाची चणचण जाणवू लागल्याने काहींची या संधीचा फायदा उठवत ही लूट केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *