सध्या ध्यास घेतलेले कार्यकर्ते समाजात तसे कमीच म्हणावे लागतील. अन्यथा पद्ममश्री पोपटराव पवार यांच्या विकास वाटेने जाऊन आपल्या स्वतः च्या गावांचा आणखी अनेकांनी सर्वांगीण विकास केला असता. असाच ध्यास वाघोली गावात विकास कामांना सुरूवात केलेली आहे. प्राथमिक शाळेचे सुशोभिकरण, शेतीसाठी जलसंधारणाची कामे, संगणक शिक्षणाची मोफत सोय भालसिंग विविध संस्थांच्या मदतीतुन करत आहेत. ग्रामस्थांच्या सकारात्मक सहकार्यामुळे हे त्यांना शक्य होत आहे. श्रमदानाचे महत्व येथील नागरिकांना समजले असुन अनेक कामे या द्वारे केली आहेत.