औरंगाबाद – सध्या कोरोनाने जगभरासह महाराष्ट्र देखील मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. मात्र औरंगाबाद शहरात सारी या आजाराने थैमान घातले आहे. सारीमुळे आतापर्यंत जवळपास १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
औरंगाबादसह, अहमदनगर, नाशिक, जालना, सोलापूर व मुंबईतही काही प्रमाणात सारीचे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.