दिल्ली – भारतीय रेल्वेने ३० जूनपर्यंतची सर्व आरक्षित प्रवासी तिकिटे रद्द केली आहे, तर विशेष आणि श्रमिक गाड्या चालू ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे विभागाने जाहीर केले आहे.
३० जूनपर्यंत आरक्षित झालेल्या ५५ लाख तिकिटांचे ८३० कोटी रुपये प्रवाशांना परत करण्यात आले आहे. तर १५ एप्रिल ते 3 मे पर्यंत रद्द करण्यात आलेल्या ३९ लाख तिकिटांचे ६६० कोटी रुपये प्रवाशांना परत करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे