अकोले (प्रतिनिधी) – कालवा सल्लागार समिती च्या बैठकीत ठरल्या प्रमाणे निळवंडे धरणातून सोमवारी सकाळी ८ वाजता उन्हाळी हंगामातील शेती व पिण्यासाठीचे सयुंक्त आवर्तन सोडण्यात येणार आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नोर यांनी दिली आहे.
१ हजार ६०० क्यूसेकने सोडण्यात येणारे हे आवर्तन अंदाजे २० ते ३० दिवस चालनार आहे. सद्यस्थितीत भंडारदरा धरणात ३ हजार ९०७ द.ल.घ.फू. तर निळवंडे धरणात ३ हजार ६५४ द.ल.घ.फू इतका पाणीसाठा आहे. या आवर्तनात अंदाजे ३ हजार ४०० द.ल.घ.फू. इतका पाणी वापर अपेक्षित आहे