मुंबई – राज्यातील रक्तदात्यांनी तसेच सोसायट्या, सामाजिक संस्था यांनी रक्तदान शिबिरं घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
ते बोलतांना म्हणाले, सध्या राज्यात कोविड रुग्णांवरील उपचारासाठीच नाही, तर विविध शस्त्रक्रिया, बाळंतपण, कर्करोग, थॅलसेमिया अशा आजारांमध्ये रक्ताची निकड असते. तसेच राज्यात आठवडाभर पुरेल एवढाच रक्ताचा साठा असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.