दिल्ली – लॉकडाऊन अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव येत आहे. साखर उद्योगाकडून मोठी बातमी येत आहे. भारतीय साखर कारखाना संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मार्च आणि एप्रिलमध्ये साखर विक्रीत जवळपास १० लाख टनांनी घट झाली आहे.
याचाच परिणाम साखरेपासून बनवल्या जाणाऱ्या उत्पादनावर देखील झाला आहे. गेल्या वर्षीच्या हंगामापेक्षा यावर्षीचे उत्पादन ६३.७ लाख टनाने कमी असल्याचे समोर आहे आहे.